राज्य मंत्रिमंडळ पुनर्रचना केली जाण्याची शक्यता काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फेटाळून लावली. बंदर कप्तानमंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्याची गरज असून अकार्यक्षम अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे राज्यमंत्रिमंडळाची पुनर्रचना करणार असल्याचे म्हटले होते.