काल म्हणजेच प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा झाला. कालांतराने या मोर्चाला हिंसक वळण (Violence During Farmers Tractor Rally) आले. या हिंसाचारामुळे सार्वजनिक मालमत्तेचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचसोबत अनेक पोलिसही जखमी झाले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत ८६ पोलीस जखमी झाले आहेत.(हा आकडा वाढण्याची शक्यता आहे). याच पार्श्वभूमीवर आता पंजाब आणि हरयाणात अलर्ट जाहीर केले आहे. तसेच तेथील मोबाईल सेवा देखील बंद करण्यात आली आहे.
सविस्तर माहितीसाठी :- loksatta | timesofindia | theindianawaaz
Web Title: Farmers Protest High Alert In Punjab Haryana Mobile Services Suspended