सध्या संपूर्ण जग कोरोनामुळे संकटात आले आहे. मात्र अजूनही चीनच्या कुरघोड्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून लडाख येथे भारत-चीन सीमावाद सुरु आहे. त्यामुळे देशाच्या तणावात अधिक भर पडली आहे. अशातच आता चीनच्या सैनिकांनी काहीशी माघार घेतलेली दिसत आहे. पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात तणाव कमी करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. कॉर्प्स कमांडरच्या बैठकीत ज्या ठिकाणाहून सैन्य मागे घेण्याचे निश्चित झाले होते, तिथून चीनची सैन्य वाहने, तंबू आणि सैनिक एक ते दोन किलोमीटरपर्यंत मागे हटले आहेत.
सविस्तर माहितीसाठी :- lokmat | loksatta | maharashtratimes | divyamarathi | pudhari
Web Title : China Has Pull Back 2Km Its Troops From Galwan Valley